About me

Monday, 6 April 2020

‘विद्यादेवी’ सावित्रीबाई रोडे: सत्यशोधक चळवळ आणि रामोशी शिक्षण परिषदा


                                                                                            उत्तम मदने

भारत देशाचा इतिहास जर आपण पहिला तर भारत देश वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या बदलातून पुढे आलेला दिसतो. असाच मोठा बदल १८१८ च्या कालखंडात चालू झाला, या कालखंडात ब्रिटीशांनी पेशव्यांची सत्ता हस्तगत करून भारतात स्वत: चा अंमल सुरु केला. ब्रिटिशांनी स्वत:ची प्रशासकीय व्यवस्था भारतात राबवायला सुरवात केली आणि त्याच बरोबर भारतात आधुनिक शिक्षणास सुरवात झाली आणि दरम्यानच्या काळात समाज सुधारकांची एक फळी तयार होऊ लागली आणि पुनर्जागरण चळवळ वेग घेऊ लागली. यातूनच पुढे महाराष्ट्रात १८४८ मध्ये ‘स्टुडंट लिटररी एण्ड सायंटिफिक सोसायटी’ ची स्थापना शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी झाली. यासारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून भाऊ दाजी लाड, गो. ग. आगरकर, धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, म.गो. रानडे इ. समाज सुधारकांनी पुनर्जागरण चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली परंतु या चळवळीमध्ये दोन विचारांचे दोन गट पाहायला मिळतात एक गट ‘प्रस्थापित व्यवस्थेच्या चौकटीत राहून सुधारणावर विश्वास ठेवणारा’ तर दुसरा गट ‘संपूर्ण व्यवस्था परिवर्तनावर विश्वास ठेवणारा’ होता.  त्यामध्ये समाज परिवर्तनासाठी झगडणाऱ्या समाज सुधारकांना प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरुद्ध लढा द्यावला लागलाला आणि या लढ्यामध्ये सर्वात पुढे होते ते म्हणजे महात्मा फुले. अशा स्वरूपाचा लढा देणे एकट्याने शक्ये नाही हे जाणून त्यांनी १८७३ रोजी पुणे येथे “सत्यशोधक समाजाचची” स्थापना केली.

सत्यशोधक समाजामार्फत सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या जातींमध्ये शिक्षणाचा प्रसार घडून आणणे, सर्व प्रकारचे धार्मिक विधी ब्राह्मण पुरोहिताशिवाय करणे, बहुजन समाजातील सामान्य लोकांना ज्योतिष,  भूतपिश्याच्य, जादूटोणा यासारख्या गोष्टींच्या भीतीपासून मुक्त करणे अशी कामे चालू केली. हि कामे चालू झाल्यानंतर विविध जातीचे लोकं समोर येऊ लागली व महात्मा फुले यांचे अनुयायी बनू लागले. अश्याच खूप साऱ्या अनुयायांमध्ये दोन अनुयायी होते ते म्हणजे धोंडीबा रोडे आणि धोंडीराम कुंभार[1].  महात्मा फुलेंचे अनुयायी बनण्यापाठीमागे या दोघांचा मोठा इतिहास आहे, १८५६ मध्ये सनातनींच्या कटकारस्थानाला बळी पडून हे दोघेही महात्मा फुलेंना मारण्यासाठी आले होते त्यावेळेस महात्मा फुलेंनी अतिशय सय्यमाने आपण काय काम करत आहोत व ते का करत आहोत हे त्यांना सांगितले आणि त्यातून त्यांना वास्तव परिस्थितीच जाणीव झाली व दोघांनी हि इथून पुढे महात्मा फुलेंबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला व ते त्यांचे अनुयायी बनले. पुढील कालावधीमध्ये धोंडीबा रोडेंचा मुलगा व सुनबाई तात्याबा रोडे व सावित्रीबाई रोडे हे दोघेही सत्यशोधक चळवळीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर काम करू लागले. हे रोडे दाम्पत्ये महात्मा फुलेंनी जे सत्यशोधक समाजाचे काम हाती घेतले होते ते पुढे नेण्यामध्ये कसोशीने प्रयत्न करत होते, यामध्ये विवध ठिकाणी जाऊन बहुजन समजामध्ये ते शिक्षांचा प्रसार  करत होते, बहुजन समाजाला वाईट चाली-रिती, रूढी परंपरा मधून बाहेर काढून वास्तवाची जाणीव करून देण्याचे काम करत होते. या काळामध्ये विविध ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या परिषदा होऊ लागल्या आणि यातीलच एका परिषदेचे अध्यक्ष स्थान सावित्रीबाई रोडे यांनी भूषविले आहे[2].

सावित्रीबाई रोडे या भटक्या विमुक्त समाजामधील अतिशय उपेक्षित समजल्या जाणाऱ्या रामोशी समाजा मधून येतात. १८७१ साली ब्रिटीश सरकारने भारतात गुन्हेगारी जमाती कायदा अस्तित्वात आणला आणि भारतातील १९३ जाती-जमाती व महाराष्ट्रातील १४ जाती-जमाती या कायद्यान्वये जन्मजात गुन्हेगार ठरल्या गेल्या[3]. भारतातील व महाराष्ट्रातील या प्रमुख जाती-जमाती मधील काही जाती-जमातीच्या उप-जाती खूप साऱ्या आहेत. रामोशी समाज महाराष्ट्रात सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

सावित्रीबाई तात्याबा रोडे या वास्तव्यास ७१०, भवानी पेठ, पुणे येथे होत्या व १९२२ मध्ये त्या पोलीस लाईन, शुक्रवार पेठ, पुणे येथे स्थलांतरित झाल्याच्या नोंदी सापडतात[4]. सत्यशोधक समाजाच्या विवध ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या सातत्याने सहभागी होऊन वेगवेगळ्या पातळीवर काम केले. अधिवेशनामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयावर निबंध सादर केले. त्यांच्या निबंधाचे विषय म्हणजे ‘शिक्षण, विद्या शिकल्याचे फायदे, अशे शिक्षण व बहुजन समाजाच्या परिस्थितीला धरून असत. हे सर्व काम करत असतानी आपण रामोशी सामाज्याची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करावे या विचारातून रामोशी समाज्याच्या शैक्षणिक विकासावर भर दिला पाहिजे हे त्यांना प्रकर्षाने जाणवले आणि त्यांनी रामोशी समाजाचा शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्याचे  काम चालू केले. त्यांनी रामोशी समाजाचा शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी ‘क्षत्रिय रामोशी संघ’ पुणे या नावाची संस्था स्थापन केली[5]. या संस्थेमार्फत त्यांनी खेडो-पाडी जाऊन रामोशी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाचे काम चालू केले, पुढे जाऊन हे काम भरभराटीला आले आणि समाज बांधवांचा या कामासाठी भरभरून प्रतिसाद मिळू लागला हे पाहून त्यांनी सत्यशोधक समाजाच्या धरतीवरच आपण हि रामोशी समाज्याच्या क्षत्रिय रामोशी संघ व सत्यशोधक सामाज्यातर्फे परिषदा घेणे गरजचे आहे हे लक्षात घेतले व पहिली रामोशी शिक्षण परिषद १९१९ रोजी मुक्काम देवराष्ट्रे, तालुका – खानापूर, जिल्हा- सातारा येथे घेतली. मे १९२० साली दुसरी प्रांतिक रामोशी शिक्षण परिषद चिंचवड, पुणे येथे घेतली. त्याचबरोबर पुढील शिक्षण परिषदा १९ नोव्हेंबर १९२१ साली घेण्यात आली. नंतरची रामोशी शिक्षण परिषद १७ मे १९२२ रोजी मुक्काम पेठ, तालुका वाळवे, जिल्हा सातारा येथे घेतली.

या सर्व शैक्षणिक परीशदामध्ये समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्व व व्यसनाचे दूरगामी परिणाम यावरती चहूबाजूंनी चर्चा घडत होत्या. अशा प्रकारच्या रामोशी शैक्षणिक परिषदा भरवून आणणे व लोकांपर्यंत शिक्षणाचे महत्व पोहचवणे व हे सर्व काम करण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि तळमळ पाहता दुसऱ्या शैक्षणिक परिषदेतील लोकांनी एकमुखाने सावित्रीबाई रोडे यांना ‘विद्यादेवी’ म्हणून संबोधिले. या शैक्षणिक परिषदांमध्ये शैक्षणिक सुधारणे बरोबरच इतरही छोटे मोठे समाज सुधारणे संदर्भात ठराव सहमत करण्यात येत होते. यामध्ये शैक्षणिक सुधारनेबरोबर सर्व प्रकारचे धार्मिक विधी ब्राह्मण पुरोहिताशिवाय करणे, रामोशी समाजातील सामान्य लोकांना ज्योतिष,  भूतपिश्याच्य, जादूटोणा यासारख्या गोष्टींच्या भीतीपासून मुक्त करणे असेही ठराव असत. विद्यादेवी सावित्रीबाई रोडे यांच्या या कार्यकर्तृत्वातून रोमोशी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक स्थितीत बदल घडू लागले. अश्या या विद्यादेविला व तिच्या कार्याला सलाम.



[1] Ugale, G. A. (2006). विद्यादेवी सावित्रीबाई रोडे. वसंतराव फाळके.सातारा
[2] Ugale, G. A. (2006). विद्यादेवी सावित्रीबाई रोडे. वसंतराव फाळके. सातारा
[3] Rathod, M. (2000). Denotified and Nomadic Tribes in Maharashtra. DNT Rights Action Group, 1–6
[4] Ugale, G. A. (2006). विद्यादेवी सावित्रीबाई रोडे. वसंतराव फाळके. सातारा
[5] चव्हाण, आर. (nd). रामोशी, मानवशास्त्र, मराठी विश्वकोश

1 comment:

  1. विद्यादेवी सावित्रीबाईंना प्रणाम

    ReplyDelete

Please give your valuable comment on the write-up and Share it on Whatsapp, Facebook, Twitter, etc. / कृपया लेखनावर आपली मौल्यवान टिप्पणी द्या आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी वर शेर करा.